जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांच करायचं काय ॽ
जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांच करायचं काय ॽ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
- 🔰 भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, रात्री 9: 56 वा. सुरत येथून
सुरत दिनांक 17/06/2024 :
इथं पैशाची गरज कोणाला नाही? जिथे खोऱ्याने पैसा आहे, तो तर अधिक हपापलेला असतो अन् भुकेला कंगाल आहे किंवा त्याचा कोंडमारा होतो आहे त्याची तर पाचावर धारण बसली आहे पण याची फिकीर कोणालाच नाही. त्यात कोवीडची महामारी गोत्यास काळ असला प्रकार होता पण जगविख्यात त्यावेळचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बश्या बैलाप्रमाणे दररोज कोमट पाणी प्यायला लावायचे याचा अर्थ काय समजावा .
अहो या बश्या बैलाने अडीच वर्षाच्या काळात केवळ दोन वेळा मुख्यमंत्री कार्यालयात जाण्याचं क्वचितच दाखवल अस नाही तर त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केवळ अडीच कोट रुपये गरजू रुग्णांना वाटण्याचा कार्यक्रम नक्कीच राबवला. त्यामुळे पाकळ्या त्यांना मतदान करतात. याच कोवीड काळात मुख्यमंत्री निधीत तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांची भर पडली. त्याच आता काय करायचं हा प्रश्न शासकीय यंत्रणेनेकडे आ वासून उभा राहिला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची माहिती मन हेलावून टाकणारी आहे कारण आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी साडेपाचशे कोटी रुपयांची अक्षरशः गरजू रुग्णांसाठी खैरात केली आणि तीही जातीधर्माच्या नावाखाली नाही पण याचा विसर मतदारांना पडला आता काय देवेंद्र फडणवीस यांनी कुणाची धुवायची अरे जो माणूस किंवा सरकार निःपक्षपाती आहे त्याला मतदान करा तिथे कुठे जातीचा कोंबडा आरवला पाहिजे आता जातपात विसरून जा , सगळे गुण्यागोविंदाने नांदत रहा
राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक