ताज्या घडामोडी

“वाचन संस्कृतीतून एक पाऊल मानवीकरणाकडे सामाजिक अभियान”

“वाचन संस्कृतीतून एक पाऊल मानवीकरणाकडे
सामाजिक अभियान”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 02/02/2024 :
वाचनातून अनेक महान माणसं घडली आजवर आपण सर्वजण जाणतोच. साधारण 1900 च्या काळापर्यंत वाचनास मुलभूत गरज मानली जायच. परंतु वाढत्या चंगळवादाने माणसा माणसात एक प्रकारची शर्यत लावली आणि आज अशी परिस्थिती आहे की टीचभर पोटाच्या काळजी पोटी माणूस वाचनापासुन अलिप्त झाला. जरी पोट भरणे गरजेचे असले तरी वाचन त्याही पेक्षा गरजेचे आहे. कारण वाचन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी विकासनशिलतेकडे घेउन जात असते आणि हीच जर प्रक्रिया थांबली तर आपण केवळ शरीरानेच माणूस बनून वावरू शकतो. त्यास मग मोबाईल वगैरेसारखी देखील कारणे आहेतच. पण मुळात भावना व विचारांचा विकास हेच तरुणांच अंतिम ध्येय असले पाहिजे. असे नसेल तर इतर प्राण्यांमधे आणि आपणा मध्ये काहीच फरक नसेल, आणि हे काम वाचनानेच होऊ शकते,
दुसरी गोष्ट अशी की, हल्ली विद्यार्थी मित्रांमध्ये आपल्या भविष्याला घेऊन टोकाची गंभीरता आली आहे, याचे परिणाम असे की विद्यार्थ्यांना डिप्रेशन सारख्या आजारास सामोरे जावे लागत आहे. याचे परिणाम असे की आपल्या शैक्षणिक ध्येयापर्यंत पोहोचण्या आधीच आपल्या मध्ये तणाव पूर्ण वातावरणामुळे अडथळे निर्माण होतात.सोबत सध्याचे तरुण आत्मकेंद्रीत होऊन सामाजिक जाणिवांपासून अलिप्त ही होत आहेत याची शक्यता ही नाकारता येत नाही.
म्हणून या अभियानाची सुरवात करणे तीन तरुणींना गरजेचे वाटले या अभियानाच स्वरूप अस की, प्रत्येक रविवारी सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 या वेळेपर्यंत असणार आहे. स्वरूपा दरम्यान 5 तास वाचन साहित्य वाचन आणि वाचनानंतर चर्चा सत्र. चर्चां मध्ये व्यक्तिमत्व विकासापासून देशाच्या अर्थव्यवस्था अश्या सर्व व्यापक विषय मांडले जातील. नंतर देशभक्ती गीते वगैरेंनी उत्साह पूर्ण शड्युल थांबले जाईल.
आपण विद्यार्थी दशेत आहोत आणि समजदार तरुण आहोत. तर आपल्या हातून काही तरी इतरांची सेवा घडली पाहिजे, आपलं ध्येय गाठत आपण कोणाच्या तरी कामी आलो पाहिजेत, या सामाजिक जाणिवेने शितल रुपाली दत्तात्रय सावंत, मनिषा आशा बजरंग तांबवे, अल्फिया तमेजा मौलाना शेख या तिघी तरुणींनी या अभियानाची संकल्पना मांडली आहे.
हे स्टूडेंट फेस्टिव्हल ज्ञान मैत्रालय अभ्यास केंद्र, शिवतेजनगर, अकलूज या ठिकाणी भरणार आहे. तरी माळशिरस तालुक्यातील अनेक विद्यार्थी या मध्ये सहभागी होणार आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button