ताज्या घडामोडी

“रत्नाईची कृषीकन्या अंजली कोरडे महात्मा फुले कृषी विद्यापीठात द्वितीय”

“रत्नाईची कृषीकन्या अंजली कोरडे महात्मा फुले कृषी विद्यापीठात द्वितीय”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 30/01/2024 :
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अंजली किरण कोरडे ही 91.70 टक्के गुण मिळवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मध्ये द्वितीय क्रमांकाचे घवघवीत यश मिळवून विशेष प्राविण्यसह कृषी पदवी उत्तीर्ण झाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये कु.अंजलीने हे यश संपादित केले असून राहुरी कृषी विद्यापीठात द्वितीय क्रमांक आल्याने तिला कै. पी. पी. छाब्रिया फिनोलेक्स अवार्ड देऊन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे पद्मभूषण डॉ.आर. एस. परिदा, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या 37 व्या पदवी प्रदान समारंभात कु. अंजलीचा विशेष गौरव करण्यात आला. याचबरोबर अंजलीने कृषी विस्तार शिक्षण विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तिला श्रीमती. कमलाबाई पाटील व कै. माधवराव पवार पदक व रोख रकमेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी विस्तार शिक्षण विषयासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या प्रा. निलेश बा. माने-देशमुख व प्रा. सचिन मारुती एकतपुरे यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.

कु.अंजली ही सातारा जिल्ह्यातील शाहबाग (वाई) येथील रहिवासी असून 2019 मध्ये तिने रत्नाई कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेला होता. तिने हे यश संपादित करून रत्नाईचे नाव अजून उज्वल करण्यात हातभार लावल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रविराज ग.नलावडे यांनी सांगितले.अंजलीच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक व महाविद्यालयाचे सभापती जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते- पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील, सचिव अभिजीत वि. रणवरे, सहसचिव हर्षवर्धन दि. खराडे-पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रविराज नलावडे यांनी तिचे अभिनंदन करून तिला उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कु. अंजलीस रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वृंदांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरपूर मार्गदर्शन लाभले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button