आपला जिल्हाप्रेरकसामाजिक

77 वा स्वातंत्र्य दिन रत्नत्रय शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा

77 वा स्वातंत्र्य दिन रत्नत्रय शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज:
मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री रतनचंद तलकचंद दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी कवायत साजरी केली. त्यानंतर मंथन या राज्यस्तरीय परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनचा तसेच योगामध्ये जिल्हास्तरवर निवड झालेल्या वैष्णवी सुतरचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गीते तसेच मनोगते व्यक्त करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला, यामध्ये सात देशभक्तीपर गीतांचा समावेश होता.सदर प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रमोद अनंतलाल दोशी यांनी शाळेची पार्श्वभूमी व भविष्यातील वाटचाल याचा मागोवा घेतला. देशाची संस्कृती टिकवण्यासाठीची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. त्यासाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा त्यांना संधी देत असते. या शाळेतील काही विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी घेत आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेंद्र शहा बोलताना म्हणाले की “विद्यार्थ्यांनी देशाला आर्थिक सक्षम बनवण्याचा संकल्प करावा. येणारी पिढी हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला”.
करमाळ्याचे माजी उपनगराध्य रतनचंद तलकचंद दोशी, बोलताना म्हणाले की” भारत हा एकमेव असा जगातील देश आहे की भारतामध्ये विविधतेत एकता आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आत्मविश्वास हा यशाचा खरा पाया आहे, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरती यशस्वी बनावे. शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील बदलानुसार बदल करावा भविष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे शैक्षणिक संक्रमण क्रांतीच्या रूपात होणार आहे.सर्वांनी संकटातून संधी शोधावी व मार्गक्रमण करण्याचे आव्हान त्यांनी केले. भविष्यात रत्नत्रय शैक्षणिक संकुल हे आदर्श शैक्षणिक संकुल होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतलाल (दादा) रतनचंद दोशी यांनी विद्यार्थी हे भविष्याचे नागरिक असून भविष्यात देश व्यसनमुक्त व भ्रष्टाचार मुक्त घडवावा असा संकल्प विद्यार्थ्यांना दिला. उत्तम नागरिक घडत असताना डोळ्यासमोर आदर्शवत जीवन ठेवण्याचे आव्हान त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास रतनचंद तलकचंद दोशी, राजेंद्र शहा, अनंतलाल दोशी, विजय विनोदकुमार गांधी, अजित दोशी, महावीर शहा, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, संजय गांधी, प्रज्योत गांधी, वालचंद शहा, प्रज्योत फडे, निशांत फडे, सिद्धांत शहा , अभिजीत दोशी, बाहुबली दोशी, वसंत ढगे,बबन गोफणे, सुरेश धाइंजे, संजय दोशी , प्रितम दोशी , रामदास गोपणे , सुरज दोशी , निवास गांधी, अजय गांधी, संजय दोशी, दत्ता भोसले, सोमनाथ राऊत, ज्ञानेश राऊत, अरविंद भोसले, विनयश्री दोशी, पूनम दोशी, पार्वती जाधव, निकीता शहा, सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर, प्रास्ताविक वाघमोडे, तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.