रत्नत्रयाच्या बाल दिंडीने सदाशिवनगर परिसर भक्तीमय
रत्नत्रयाच्या बाल दिंडीने सदाशिवनगर परिसर भक्तीमय
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 29/6/2023 :
मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीचा दिंडी सोहळा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी व उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते पालखी पूजन करण्यात आले.
रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर ते रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे या मार्गावरती सर्व विद्यार्थी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत निघाले. याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञनेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. सालाबादप्रमाणे यावर्षीही जगदीश राजमाने व रत्नत्रय पतसंस्थेने बाल वारकऱ्यांना खाऊ वाटप केले. रत्नत्रय शैक्षणिक संकुलामध्ये पालखी पोचल्यानंतर गोल रिंगण करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशालेच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या दिंडी सोहळ्यामध्ये फुगडी तसेच इतर पारंपारिक वारकरी संप्रदायातील खेळ सादर केले. विठ्ठलाच्या व ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची प्रदक्षिणा तसेच रिंगण सोहळा देखील साजरा करण्यात आला. या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाया ची महानता समजावे हा उद्देश होता.
सदर प्रसंगी अनंतलाल (दादा) दोशी, सदशिवनगरचे सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर सचिव प्रमोद अनंतलाल दोशी,सहसचिव अभिजित दोशी, अजित दोशी, संचालक, रामदास कर्णे, देविदास ढोपे ,बबन गोफणे, बाहुबली दोशी, दत्ता भोसले, वसंत ढगे , अजय गांधी, सुरेश धाईजे , शहाजी देशमुख, सतिश बनकर, रामदास गोपणे, संजय गांधी, संजय दोशी, जगदीश राजमाने, श्रेणीक दोशी, ज्ञानेश राऊत, अमित पाटील , दैवत वाघमोडे, तसेच सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
“रत्नत्रय परिवाराच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये विधायक असे भरीव योगदान नेहमीच होत आहे. त्यामुळे सर्वत्र रत्नत्रय परिवाराच्या नावलौकिकाचा ठसा उमटला आहे.” अशी प्रतिक्रिया सर्वजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक संपादक अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, आणि aklujvaibhav.in) व वृत्त एकसत्ता चे कार्यकारी संपादक सुनील ज्ञानेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली.