ताज्या घडामोडी

सावधान …..✍️

सावधान …..✍️

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 19/02/2024 :
होय सावधान म्हणतेय मी !! जसं एखादं शुभमंगल होत असताना आपल्याला ‘शुभमंगल सावधान’ म्हणून सावध करत असतात ना अगदी तसे हो तसेच मी सुद्धा हा सावधान लेख लिहून साहित्यिक विश्वामध्ये जे खोट्या लेखणीचे मालक आहेत अशांना मी सावधानतेचा इशारा देत आहे. इथे मी लेखिका /वाचक म्हणून आपणास सावधान म्हणत आहे. कारण साहित्य हे माझं विश्व आहे आणि माझ्या विश्वात जर असे चौर्य करणारे आले तर माझ्या साहित्यासह माझ्या इष्ट मित्रांचेही साहित्य, माझं साहित्यिक घर कसं आबादित राहील. म्हणून एक प्रयत्न करत आहे.
बघा ना कविता ,लेख चोरी नंतर आता तर लोक सर्रास पेपर मध्ये जेव्हा लेख देतात. त्या लेखातला मजकूर ही गुगल वरून जशास तसा घेऊन त्यात थोडाफार बदल करून पेपर मध्ये छापायला देतात .आणि विशेष म्हणजे ई पेपरचे संपादक असो वा इतर पेपर चे संपादक असो आलेल्या लेखाचे परीक्षण न करता जशास तसा मजकूर संबंधित लेखक लेखिकेच्या नावाने छापत आहेत. याला काय म्हणावे?!! हा ही एक गंभीर प्रश्न आहे यावरही बोललं पाहिजे.
आपलं नाव सतत पेपर मध्ये आलं पाहिजे आपलं लिखाण दररोज पेपर मध्ये छापलं गेलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या लेखणीतलं सातत्य आपण एक स्तंभ लेखक किंवा लेखिका आहोत आपल्याला प्रत्येक दिनविशेष यावर सखोल लिहिता येतं हे दाखवण्यासाठी चाललेली ही खोटी घोडदौड आहे. यासाठी माझ्या पाहण्यात आलेल्या बऱ्याचश्या लेखांचे जेव्हा मी वाचन करते तेव्हा ते लेख किंवा त्या लेखातील एखादा पॅरेग्राफ कधी कधी तर संपूर्ण लेख हा गुगल वरून जशास तसा घेतलेला माझ्या निदर्शनास आलेला आहे त्याची पुरावे ही माझ्याकडे आहेत परंतु कुण्या एका लेखक किंवा लेखिकेचे पुरावे असे सारे आम देऊन मी त्यांचे मनोबल कमी करू इच्छित नाही किंवा त्यांना मी या साहित्यिक विश्वामध्ये अपमानित करू इच्छित नाही. तरीसुद्धा मला या विषयावर यासाठी लिहावे वाटले कारण दररोज लिखाण यावे यासाठी ही चाललेली धडपड चुकीची आहे कमीच लिहावे परंतु दर्जेदार लिहावे आपल्या लिखाणात आपले विचार असावेत आणि हे विचार आपण गुगल वरून चोरून लिहू शकत नाही तर प्रत्येक दिनविशेष असो किंवा एखादे महापुरुष असो त्यांची जयंती पुण्यतिथी त्यांचे कार्य यांचे आपण सर्वप्रथम वाचले पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे नेमकं त्यांनी केलेल्या कार्यातून आपणास समाजाला आज घडीला नेमकी कोणती प्रेरणा आपण देऊ इच्छितो जेणेकरून आपण आपल्या समाजाला एका चांगल्या दिशेला घेऊन जाऊ .त्यामध्ये एखादा विशेष बदल घडवून आणू असे लिखाण आपण वैचारिक पद्धतीनेच करू शकतो आणि हे विचार फक्त आणि फक्त खरे साहित्यिकच करू शकतात गुगल वरून साहित्य मिळवून त्यात थोडाफार बदल करून किंवा यमक जुळवतील अशा पद्धतीने रचना करून ती एखादी कविता आहे असे असे भासवून जर आपण ते काव्य ते साहित्य प्रसारित करण्यासाठी देत असू तर मला वाटते हे चुकीचे आहे. आणि अशा साहित्याची समाजाला साहित्य विश्वासाला थोडी ही आवश्यकता नाही. म्हणून हे थांबायला हवं असे लिखाण जर पेपर मध्ये छापून येत असतील तर संबंधित पेपरच्या संपादकांनी सुद्धा यावर रीतसर कारवाई करावी . एखाद्या वाचकाच्या समोर असे लेख किंवा कविता वाचनात आल्या तर कृपया त्यांनी संबंधित संपादकाला निदर्शनास आणून द्यावे तरच हे असे खोटे साहित्यिक होणार नाहीत कविता व लेख चोरीस जाणार नाहीत. यानंतर माझ्याही निदर्शनास जर अशा काही कविता किंवा लेख वाचनात आल्या तर मी माझ्या फेसबुक वॉल वरून नक्कीच आपल्यासमोर पुराव्यानिशी ठेवीन.
तेव्हा मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तो संबंधित लेख व गुगल वरचे साहित्य दोन्हीही स्क्रीन शॉट आपल्यासमोर देईन व संबंधित पेपर सुद्धा आपल्यावर रीतसर कारवाई करेल.तेव्हा …. सावधान !!!

@सौ.अंजली मनोज मुनेश्वर नांदेड
९६३७११६५५३

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button