ताज्या घडामोडी

पत्रकार शोभा वाघमोडे यांनी बंदी जणांना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन.

पत्रकार शोभा वाघमोडे यांनी बंदी जणांना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन.

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
माळशिरस प्रतिनिधी :
दिनांक १९/८/२०२४ रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून पत्रकार शोभा वाघमोडे यांनी ६० बंदी जणांना राख्या बांधून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली व अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक बंदी जणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बहिणीने आपल्या भावांना अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.
तसेच अनेक शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता येत नसल्याने अधिकारी,कर्मचारी,माजी सैनिक, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व सर्व पोलीस स्टाफ या सर्वांना तसेच माळशिरस तहसीलदार यांच्या परवानगी जेलर यांच्या समक्ष राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button