मानव अधिकार संरक्षण समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किसन त्र्यंबक आटोळे यांची निवड
मानव अधिकार संरक्षण समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किसन त्र्यंबक आटोळे यांची निवड
Akluj Vaibhav News Network.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/07/2024 :
बाळसमुद्र (तालुका शिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा) येथील किसन त्र्यंबक आटोळे यांची नुकतीच मानव अधिकार संरक्षण समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. मानव अधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भगवानभाई दाठिया यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांनी एका पत्रकान्वये ही नियुक्ती केली.
मानवी हक्क समिती ही १८ स्वतंत्र तज्ञांची संस्था आहे जी तिच्या राज्य पक्षांद्वारे नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते. नागरी आणि राजकीय अधिकारांची अंमलबजावणी कशी केली जात आहे याबद्दल सर्व राज्य पक्षांनी समितीला नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मानवी हक्क उल्लंघनासंबधीच्या तक्रारींची चौकशी करताना आयोगास केंद्र सरकारकडून किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून किवा दुय्यम असणाऱ्या अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून किवा संघटनेकडून माहिती किवा अहवाल मागविण्याचा अधिकार असेल. अहवाल मिळाला नाही तर आयोगास स्वतः हूनच अशा तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार असेल.
यापूर्वी आटोळे यांनी प्रदेश सचिव, भाजपा भटके विमुक्त (VJNT) आघाडी महाराष्ट्र प्रदेश या पदावर सक्रिय काम केलेले आहे. निवडीबद्दल आटोळे यांचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, अकलूज वैभव डॉट इन(aklujvaibhav.in), माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ, दैनिक शिव निर्णय, दैनिक अचूक निदान, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन, नॅशनल युनियन बॅकवर्ड एस् सी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी., शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य किसान महासंघ दिल्ली, इत्यादींचे वतीने समाजसेवक सेवाजेष्ठ( पत्रकारितेमधील 50 वर्षे पूर्ण) पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) यांनी किसन आटोळे यांच्या नवनियुक्ती बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
किसन त्र्यंबक आटोळे यांच्यासारख्या क्रियाशीलपणे समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीची सार्थ निवड केल्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भगवानभाई दाठिया, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांना,
धन्यवाद दिले.