विधानपरीषद निवडणुकीत जेष्ठ नेते भाई जयंत पाटील यांचा पराभव होणे राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणे ; खा.धैर्यशिल मोहिते-पाटील
विधानपरीषद निवडणुकीत जेष्ठ नेते भाई जयंत पाटील यांचा पराभव होणे राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणे ; खा.धैर्यशिल मोहिते-पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/07/2024 :
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, सुसंस्कृत, अभ्यासु, तत्वनिष्ठ आणि ५ टर्म विधानपरिषदेचे सदस्य असलेले जेष्ठ नेते जयंत पाटील यांचा विधानपरीषद निवडणुकीत झालेला पराभव हा लोकशाहीचा गळा घोटणारा आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याचा पराभव होणे राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रीया खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
मागच्या २/३ महिन्यापुर्वी राज्यात महायुतीचे वातावरण असताना आ.जयंत पाटील अकलूजला आले होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी अकलूजची भूमी आहे व येत्या दहा बारा दिवसात तुम्हाला ते दिसून येईल असे सांगितले होते त्यानंतर लोकसभेच्या निकालात ते दिसुन आलं.
महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती आहे.जनता सुसंस्कृत नेत्यांवर प्रेम करते. राज्यभर शेकापचे जाळे पसरलेले आहे. या पराभवामुळे आ.जयंत पाटील यांना सहानभूतीच मिळणार आहे व भविष्यात पाटील साहेबांची भूमिका महत्वपूर्ण व राज्यातील राजकारणाला निश्चितच कलाटणी देणारी असेल.आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत असे ही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.