बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज” – रणजीत शेंडे
“बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज” – रणजीत शेंडे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/06/2024 :
“बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे.महिलांनी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून मोठे उद्योजक व्हावे व स्वतःच्या पायावर उभे राहून चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह व्हावा” असे मत रणजीत शेंडे यांनी व्यक्त केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्र खुडूस अंतर्गत मौजे निकमवाडी खुडूस येथे नवीन स्वाभिमान ग्रामसंघ समुदाय निधी कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले तेंव्हा ते बोलत होते.
ग्रामसंघ अध्यक्षा निकम व सोनाली ठवरे, आकांक्षा लोक संचलित साधन केंद्रचे सचिव व व्यवस्थापक दत्तात्रय गोरे, क्षेत्र समन्वयक सुवर्णा लंगोटे व समूह साधन व्यक्ती जयश्री पळसे तसेच ग्रामसंघ लेखापाल रुपाली बोरकर व बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
स्वाभिमान ग्राम संघ निकमवाडी येथील पाच बचत गटातील महिलांना समुदाय निधीतून तीन लाख रुपयाचे वाटप करण्यात आले.तसेच ५ जूनचे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बचत गटातील शंभर महिलांना केशर आंब्याची रोपे मोफत वाटप करण्यात आले तसेच निकमवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन जयश्री पळसे यांनी केले तर आभार सुवर्णा लंगोटे यांनी मानले