नागनाथ ॲग्रोटेक अकलूज मध्ये समाजसेवक भाग्यवंत ल. नायकुडे यांचा सन्मान
नागनाथ ॲग्रोटेक अकलूज मध्ये समाजसेवक भाग्यवंत ल. नायकुडे यांचा सन्मान
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 03/06/2024 :
वयाच्या सोळाव्या वर्षी पत्रकारिता सुरू करून अखंड 50 वर्षे पत्रकारितेबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे समाजसेवक, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एन यु बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना) यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकलूज येथील नागनाथ ॲग्रोटेक मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. वृक्ष शास्त्र बायो ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बारामती चे कार्यकारी संचालक अजित भागवत पताळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रवीण काळे, हनुमंत शिवाजी मिसाळ, राजेंद्र तुळशीराम घाडगे, जयकुमार बाळू मगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी आणि आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांची एन यु बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी निवड होणे ही फार मोठी गौरवास्पद बाब आहे. आणि याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. त्यांचे कार्य पाहता त्यांची एक्झिक्यूटिव्ह कमिटी मेंबर म्हणून वर्णी लागावी अशी शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करीत आहे. अशा मोजक्या शब्दात अजित पताळे यांनी नायकुडे यांचा गौरव केला.
“राष्ट्रीय पिछडावर्ग, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति एवम अल्पसंख्यांक महासंघ अर्थात एन यु बी सी च्या नॅशनल प्रेसिडेंट श्रीमती एस गीता, नॅशनल वर्किंग कमिटी प्रेसिडेंट एस सुवर्णकुमार, जनरल सेक्रेटरी एस सत्यसेन, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेस्टर्न भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या बहुमोल सहकार्याने समाजसेवक म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे या संधीचे सोने करून नक्कीच दाखवीन” असा आत्मविश्वास ठामपणे या सन्मान सोहळ्याप्रसंगी पत्रकार नायकुडे यांनी व्यक्त केला.