देशातील सर्व दरोडेखोर केजरीवाल बचावासाठी उध्या एकत्र

देशातील सर्व दरोडेखोर केजरीवाल बचावासाठी एकत्र
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज /आकाश भा. नायकुडे
चोरांना कोणतीही जात नाही आणि त्याहूनही धर्म नसतो तर त्यांचा धर्म असतो ‘ तुझा माल माझा माल आपण खाऊ सारा माल ‘ असाच काहीसा प्रकार असतो त्यामुळे ‘ चोरीचा मामला हळूहळू बोंबला ‘ नाहीतर चोरीचा मामला दिल्लीच्या रामलीला मैदानावर बोंबला अशा पध्दतीचा झाल्याने देशातील भाजप व त्यांचे मित्र पक्ष वगळता इतर सारे झाडून महा दरोडेखोर राजकीय पक्ष व त्यांचे नेते उद्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शंख करण्यासाठी एकत्रितपणे आपले काळे थोबाड आणखी काळे कसे आहे हे दाखवण्यासाठी जंगजंग पछाडणार आहेत .
या सर्व दरोडेखोर नेत्यांनी आपल्या देशातील जनतेला इतकं लूटल आहे की त्यामुळे देशातील निम्म्यापेक्षा अधिक जनतेला दोन वेळच सोडा पण एका वेळच पुर्ण जेवण मिळत नाही त्यामुळे ही जनता दिवसेंदिवस कुपोषित होत आहे तर इकडे इंडिया नामक आघाडीच्या नेत्यांना आपले शारीरिक वजन आवरताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे , इतकं या आधुनिक बकासुरांनी एक दोन नाही तर तब्बल साठ वर्षे खा खा ओरबाडून खाल्लं आहे .
त्यामुळे या बकासुरांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी नियतीने नरेंद्र मोदी यांच्या सारखा निस्सीम देशभक्त पंतप्रधान म्हणून पाठवला आहे पण या देशावर राज्य करण्याचा आपलाच मक्ता आहे त्यामुळे मोदी विरोधक चांगलेच चवताळले आहेत मग काय उठसूठ मिळेल तेंव्हा आणि मिळेल तिथे बोंबाबोंब करायला या दरोडेखोरांना निमित्त हवं असतं , आता त्यांना पालखी मिळाली आहे ती दिल्लीचे महाभ्रष्ट आणि तितकेच महा बिलंदर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची .
अरविंद केजरीवाल यांनी दारुचा लोच्या करून तब्बल शंभर कोटी रुपये हडपले व या पैशातून त्यांनी पंजाब व गुजरात राज्यातील निवडणूका झळकावून टाकल्या असल्याने त्यांना ईडीने दहा समन्स बजावल्यानंतर आठ दिवसांपूर्वी अटक केली यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया , मंत्री सत्येंद्र जैन आणि अतिशय उर्मट खासदार संजय सिंह या तिघांना अटक केली त्याला आता वर्षाचा कालावधी क्रमाक्रमाने झाला असेल तरी न्यायालयात त्यांना जामीन मंजूर होत नाही , यात आता या तिघांनी मिळून दिलेल्या जबानीनुसार त्यांचाच म्होरक्या असणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे , ही अटक बेकायदेशीर आहे , केंद्र सरकारने देशात दडपशाही चालवली आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना तातडीने जामीन मंजूर करावा अशा फालतू व तितक्याच निरर्थक मागण्या घेऊन देशातील विविध पक्षांचे दरोडेखोर दिल्लीतील रामलीला मैदानावर लाक्षणिक आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करणार आहेत .
काही हरकत नाही कारण लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार असतो हे जरी खरं असलं तरी तो अधिकार या दरोडेखोरांनी कधीच गमावला आहे कारण इंडिया नामक आघाडीच्या बहुतांश नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत इतकेच काय यातील काॅंग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुल गांधी हे नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात करोडोंची माया हडपल्यामुळे जामीनावर आहेत , हे दैनिक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केले होते व त्यासाठी विश्वस्त मंडळ नेमून देशातील विविध ठिकाणच्या जागा व त्यावरील उभ्या असलेल्या टोलेजंग इमारती भाडयाने देण्याचा उपद्व्याप या गांधी कुटुंबातील सदस्यांनी केला शिवाय काही जागा विकल्या व मालकीची हेराफेरी केली असा आरोप आहे .
दुसरे चारा घोटाळा , तिसरे टुजी स्पेक्ट्रम घोटाळा , चवथे कोळसा घोटाळा , पाचवे कोरोना काळातील खिचडी घोटाळा , सहावे दिल्लीतील स्व मालकीच्या शासकीय इमारती भाडयाने देणे असे शेकडो आरोप न्यायालयात आजही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत , आता बघा हे सगळे दरोडेखोर का महा दरोडेखोर एकत्र येऊन दिल्लीचे महा बिलंदर व दारुत सुध्दा शंभर कोटी रुपये लुटल्याचा आरोप असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बचाव करण्यासाठी रामलीला मैदानावर लाक्षणिक आंदोलन करून सरकारलाच आव्हान देणार आहेत आहे का नाही सगळा विनोद.
राजाभाऊ त्रिगुणे
सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक