रत्नत्रय पतसंस्थेचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

रत्नत्रय पतसंस्थेचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/03/2024 :
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेचा 20 वा वर्धापन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच विरकुमार दोशी कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी, संचालक संजय गांधी, रामदास गोफणे, जगदीश राजमाने, अजय गांधी, संजय दोशी, सुरेश गांधी, तज्ञ संचालक सुरेशकाका कुलकर्णी, सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमन झाला
संस्थेचे संस्थापक अनंतलालदादा दोशी म्हणाले की लवकरच आपली पतसंस्था ही भव्य जागेत अशी इमारत बांधत आहे व यापेक्षाही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले , कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले त्यावेळी त्यांनी सांगितले रत्नत्रय पतसंस्था आज 20 वर्धापन दिन साजरा करत आहे व 21 व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत असताना संस्थेने 22 कोटी ठेवींचा आकडा पार केलेला आहे हा आकडा संस्थापक व संचालक मंडळावर सर्व ठेवीदारांनी दाखवलेला हा विश्वास आहे. आपली संस्था ही संपूर्ण संगणकृत असून ऑनलाईन व्यवहार करीत आहे. सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढणे, आरटीजिएस, एनएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, क्यू आर कोड पेमेंट द्वारे पैसे काढणे, वाहन इन्शुरन्स, नवीन पासपोर्ट काढणे अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या असल्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये संस्थेने एक विश्वासाचे नाते तयार केलेले आहे.
तज्ञ संचालक सुरेश कुलकर्णी, चेअरमन विरकुमारभैया दोशी, कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व पुढील काळात हे सर्व संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्यासाठी कायम तत्पर राहील असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक जगदीश राजमाने यांनी मानले तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी,वैभव मोडासे, मंगेश जगताप, टि.डी.देशमुख, नीता रणवरे विक्रम पालवे , युवराज वाळकुंदे व रणजित गोरडे यांनी काम पाहिले