ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 16/01/2026 :
आपण प्रत्येकजण आपल्याला हवी ती गोष्ट मिळावी म्हणून उत्सुक असतो. तसा प्रयत्न सुद्धा करतो. चुकून ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर मात्र आपली खूप चिडचिड होते.
इथे आपल्याकडे संयम हवा. आता नाही मिळाली तरी नंतर मिळू शकते हे आपणच आपल्या मनाला समजावले पाहिजे. अशा वेळेस अधीरपणा किंवा मनाची चंचलता या गोष्टी त्रासदायक होतात.
मुलांनो, मन चंचल असते पण त्याला संयमाची वेसण घालावी लागते. आत्तापासून ही सवय लावून घ्या. मोठेपणी आपण संयमी नसणे हा आपला दुर्गुण समजला जातो.
सौ. स्नेहलता स. जगताप
