ताज्या घडामोडीदेश विदेशलेख

⭕अमेरिकेने खरचं चंद्रावर मानव पाठविले होते का? – महेंद्र कुंभारे, 🟣 “तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतच जगात बाप आहे”

⭕अमेरिकेने खरचं चंद्रावर मानव पाठविले होते का? – महेंद्र कुंभारे,

🟣 “तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतच जगात बाप आहे”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/8/2023 :
चांद्रयान-२ च्या असफलतेनंतर नुकतेच भारताने चांद्रयान-३ ही मोहिम फत्ते केली आहे. त्यापूर्वी दोनच दिवस आधी रशियाचे यान फेल झाले. तंत्रज्ञानाच्या बाबतीत रशियाला कमी लेखून चालणार नाही. तरीही त्यांची चांद्रयान मोहीम फेल झाली. याबाबतीत चीन आणि जपानही कमी नाहीत. अमेरिकेचा दबदबा तर संपूर्ण जगात आहे. त्यांचीही टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे यात तिळमात्र शंका नाही. मात्र, रशिया आणि भारताला चांद्रयान पाठविण्यासाठी काय काय करावे लागले ते पाहता सन १९६९ रोजी अमेरिकेने चंद्रावर निल आर्मस्ट्राँग आणि इतर दोन मानवांना खरचं पाठविले होते का? याबाबत मनात शंका उपस्थित झाली आहे. खरचं मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले का? का, अमेरिकेने जगाच्या डोळ्यात धुळफेक केली? अशी शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे.
जर सन १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर मानव पाठविले होते तर आज ५० वर्षानंतर अमेरिकेने पुढचे टप्पे पार का नाही केले? आजपर्यंत त्यांनी चंद्रावरील खनीजांचा शोध का घेतला नाही? ५० वर्षापूर्वी अमेरिका तंत्रज्ञानात इतकी प्रगत असताना आता तर विज्ञानाने खुपच प्रगती केली आहे. मग, अमेरिकेने गुरु, शनि, मंगळ आणि सूर्य मोहिमही फत्ते करायला हवी होती. ५० वर्षापुर्वी मानव इतका प्रगत असताना आजही २०२३ पर्यंत जगातील कित्येक देश चंद्रावर का पोहचू शकले नाहीत? आपण पाहिले असेल चांद्र मोहिमेसाठी कित्येक वर्ष तयारी करावी लागते, पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदण्यासाठी यानाला प्रचंड उर्जा लागते. शेकडो शास्त्रज्ञ यानाला कंट्रोल करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात. मग, सन १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर मानवासह पाठविलेल्या यानाला चंद्राचे गुरूत्वाकर्षण भेदून पृथ्वीच्या दिशेने पाठविण्यासाठी उर्जा कुठून मिळाली? आणि त्या यानाला कोण कंट्रोल करत होते? याबाबत शंका उपस्थित होत आहे.
मग निल आर्मस्ट्राँग आणि इतर दोन मानवांनी चंद्रावर जाऊन फोटो काढले की कोणत्यातरी स्टुडिओ मध्ये? अमेरिकेच्या दादागीरीला घाबरुन इतर देश गप्प तर बसले नाही ना? भारतीय चांद्रयानच्या निमित्ताने हा विचार करणे भाग पडले. जर अमेरिकेची चांद्र मोहिम खोटी आणि फसवी असेल तसेच रशियाची मोहिम फेल झाली असेल, तर जगात एकमेव भारतच असा देश आहे की जो चंद्रावर प्रथम पोहचला आहे. भारताने जगाला याची देही याची डोळा चंद्रावर यान उतरवून दाखविले. याची दखल संपूर्ण जगाने घेतली. त्यामुळे “तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतच जगात बाप आहे” हे सिध्द झाले आहे!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शुक्रवार दि. २५ आँगस्ट २०२३.
मो.नं. 8888182324.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.