ताज्या घडामोडी

“ग्रामपंचतीने पुरातन आङावरील अतिक्रमण न हटविल्यास अंदोलन करणार”- कालिदास मगर

“ग्रामपंचतीने पुरातन आङावरील अतिक्रमण न हटविल्यास अंदोलन करणार”- कालिदास मगर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/03/2025 :
निमगाव मगराचे, ता.माळशिरस येथील ग्रामपंचत हद्दीतील गावतील सर्वे नंबर ५८६ मधील आडावर अतिक्रमण करण्याचे काम चालु आहे ते अतिक्रमण काढून टाकुन पुरातन ठेवा जपुन ठेवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कालिदास मगर यांनी निमगाव ग्रामपंचत, पंचायत समिती माळशिरस यांच्याकङे केली असुन हे अतिक्रमण न हटविल्यास अंदोलन करण्याचा इशारा माळशिरस पंचायत समितीचे गटविकास आधिकारी ङाॅक्टर आबासाहेब पवार यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
पुर्वी गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावाच्या ठराविक भागामध्ये आङ खोदुन चिरेबंद दगङांनी कोरीव बांधकाम केरून त्यावर रहाट बसविले होते. त्यातील पाणी बादली द्वारे काढुन पिण्यासाठी वापरले जात होते. आता सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती उद्भभवल्यास त्या आङवर मोटर टाकुन गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. माञ ही गावाची पुरातन ओळख आङावर अतिक्रमण करून पुसण्याचा जोरदार प्रयत्न चालु आहे. तो त्वरित थांबवावा न थांबवल्यास अंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button