ताज्या घडामोडी

“अहिल्यादेवींचे विचार आत्मसात करण्याची गरज” – मैत्रेयी शिरोळकर

“अहिल्यादेवींचे विचार आत्मसात करण्याची गरज” – मैत्रेयी शिरोळकर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/03/2025 : “अहिल्यादेवींचे विचार आत्मसात करण्याची गरज” असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख मैत्रेयी शिरोळकर यांनी शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सुशासन या विषयावर समितिच्या प.म.प्रांत बौद्धिक प्रमुख मैत्रेयी शिरोळकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक भाग्यश्री जाधव होत्या. व्यासपीठावर अधिवक्ता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड. धनंजयराव माने, शहर अध्यक्ष अग्रवाल, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती शिरोळकर यांनी अहिल्यादेवींच्या शासनातील राजकारण, समाजकारण, न्यायनिवाडा, पर्यावरण, प्रजेची काळजी, राष्ट्र हितासाठी अनेक रूढींना छेद देत उपभोगशून्य जीवन जगत सुशासन, संरक्षण, महिलांची सेना उभारणी अशा अनेकानेक पैलूंची माहिती पोचवली. ओघवती भाषा, स्पष्ट विचार व्यक्त करत श्रोत्यांचे समाधान केले.
कार्यक्रमात पद्य, अपर्णा सहस्रबुद्धे यांच्या भारूडाने रंगत आणली. प्रास्ताविक समितिच्या सोलापूर जिल्हा कार्यवाहिका देवयानी देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. यशश्री जोग यांनी केले.
संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button