“रत्नाई मिठाई” प्रताप क्रीडा मंडळाचा”ना नफा, ना तोटा” तत्त्वावरील सामाजिक उपक्रम आहे : अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील

“रत्नाई मिठाई” प्रताप क्रीडा मंडळाचा”ना नफा, ना तोटा” तत्त्वावरील सामाजिक उपक्रम आहे : अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 2/11/2023 : “रत्नाई मिठाई” हा प्रताप क्रीडा मंडळाचा “ना नफा, ना तोटा” तत्त्वावरील एक सामाजिक उपक्रम आहे असे प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी म्हटले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना दिवाळीचा सण साजरा करता यावा यासाठी योग्य व किफायतीशीर दरात “रत्नाई मिठाई” या उपक्रमातून दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती सांगताना त्या बोलत होत्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला होता. यानंतर कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर हा सामाजिक उपक्रम ” रत्नाई मिठाई ” या नावाने सुरू झाला.
दरवर्षी दिवाळीपूर्वी हा समाज उपयोगी उपक्रम राबविला जातो. यावर्षी दिनांक ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रत्नाई मिठाई केंद्र, शंकरनगर येथील मारुती मंदिर नजीक सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
सदरच्या मिठाई केंद्रात चिवडा, लाडू, शंकरपाळी, बालुशाही व शेव हे फराळाचे पदार्थ किफायतीशीर दरात उपलब्ध होणार असून ते स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्या पासून बनवलेले असणार आहेत. यामध्ये चिवडा प्रति किलो २३५ रु., लाडू प्रति किलो २४५ रु, बालुशाही प्रति किलो २४५ रु, शंकरपाळी प्रति किलो २४०रु, व शेव प्रति किलो २३५ रु,किलो या दरात उपलब्ध होणार आहेत. मंडळांने हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. यासाठी नामदेव कुंभार 95 11 80 8004, जयंत माने देशमुख 77 200 67 824, शिवाजी पारसे 83 29 590065, बाळासाहेब सावंत 99 60 19 58 39 यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावरचा रत्नाई मिठाई हा समाज उपयोगी उपक्रम आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.