महाराष्ट्र

लाभार्थी संख्या घटत असेल तर किसान सन्मान योजनेच्या अटी शिथिल केल्या पाहिजेतः आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

लाभार्थी संख्या घटत असेल तर किसान सन्मान योजनेच्या अटी शिथिल केल्या पाहिजेतः
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे यांज कडून)

मुंबई दिनांक 30/7/2023 :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे निकष राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी लागू करण्यात आले असून राज्यातील ९७ लाख ६५ लाभार्थ्यां शेतकऱ्यांपैकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळाला पाहिजे. निकषांच्या अटीत ते राज्यशासनाच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहू नयेत. निकषांच्या अटी शिथिल केल्या पाहिजेत म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
प्रत्येक हप्त्यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटत आहे. योजनेच्या निष्कर्षामध्ये वारंवार केलेल्या बदलामुळे १४ व्या हप्त्यासाठी राज्यातील फक्त ८५ लाख ६६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ता वर्ग झाला आहे.अशा प्रकारे केवायसीच्या माध्यमातून अटी शर्टी लागून करून लाभार्थ्यांची शेतकरी कमी कमी होत आहे,किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठीच्या अटी शिथिल करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ देण्याबाबत तसेच दोन्ही योजनांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाने त्वरित कार्यवाही करण्याची विनंती आ.मोहिते-पाटील यांनी राज्यसरकारकडे केली.
यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पात्र लाभार्थ्यांची भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बँक खाती आधार संलग्न करणे या तिनही बाबींची पूर्तता केलेले एकूण ७६.५५ लाख लाभार्थी १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी पात्र ठरल्याचे सांगितले तथापि,केंद्र शासनाने बंधनकारक केलेली ई-केवायसी प्रमाणिकरणाची बाब शिथिल केली असल्याने सद्य:स्थितीत राज्यातील एकूण ८५.०१ लाख पात्र लाभार्थीना लाभ झाल्याचे सांगितले.
तसेच राज्यातील एकूण ९७.६५ लाख पात्र लाभार्थीपैकी ९५. २७ लाख लाभार्थीच्या भूमि अभिलेख नोंदी पी.एम. किसान पोर्टलवर अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत.उर्वरीत २.३८ लाख लाभार्थीच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ८४.८१ लाख लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणिकरण व ८७.७७ लाख लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न करण्यात आलेली असून योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या प्रलंबित बाबींची कार्यपूर्तता करणेसाठी सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्टल पेमेंट्स बँक (IPPB) यांचे सहकार्याने गावपातळीवरील कॅम्प आयोजित करण्यात आले असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

“प्रधान मंत्री किसान योजनेतील पात्र शेतकऱ्याचा मृत्यु झाला असल्यास त्यांच्या वारसांना ७/१२ उताऱ्यावर नोंद लागुन नव्याने रजिस्ट्रेशन केलेले असले तरी किसान सन्मान योजनेचा लाभ लाभ मिळालेला नाही. जिल्हा प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालुन राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्यापासुन मृत शेतकऱ्यांचे वारस वंचित राहणार नाहीत याची जबाबदारी घेतली पाहिजे” : आ.आ.रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button