ताज्या घडामोडी

“ओंकार साखर कारखान्यामुळे माळशिरस तालुक्याच्या विकासात भर”- जयंत पाटील

“ओंकार साखर कारखान्यामुळे माळशिरस तालुक्याच्या विकासात भर”- जयंत पाटील

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 11/05/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी चांदापुरी तालुका माळशिरस येथील साखर कारखाना ताब्यात घेऊन या परिसरातील उसाचे गाळप करून शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक दर दिला रोजगार निर्मिती केली व नव्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प हाती घेऊन माळशिरस तालुक्याच्या विकासात भर टाकण्याचे काम केले असे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर होते. पुढे बोलताना साखर उद्योग शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित आहे तो व्यवस्थित चालवला पाहिजे. ज्या भागातील साखर कारखाने आर्थिक अडचणीमुळे बंद होते ते चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी चालू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, वाहतूकदारांना व कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे दिले असेही पाटील म्हणाले.
बोत्रे पाटील यांनी कमी कालावधीमध्ये नऊ साखर कारखाने व्यवस्थित चालविले याबाबत अध्यक्षस्थानावरुन बोलताना माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ओंकार परिवाराचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार संजय शिंदे, दादासाहेब फराटे पाटील, दादासाहेब बोत्रे पाटील, ओंकारच्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते शेवटी चेअरमन बाबुराव मोहिते पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button