महिला सक्षमीकरणांमध्ये कायदा सुव्यवस्था व न्यायव्यवस्था महत्वपूर्ण

महिला सक्षमीकरणांमध्ये कायदा सुव्यवस्था व न्यायव्यवस्था महत्वपूर्ण
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 31/12/2023 :
दि ३० डिंसेबर २०२३ रोजी ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी मध्ये कायदा व न्यायव्यवस्था यांची महिला सक्षमीकरण मधील महत्त्वपूर्ण भूमिका या विषयावर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती अँटी रॅगिंग समिती अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा यांच्या वतीने ग्रीन फिंगर्स महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबर कायदेविषयक माहिती असणे खूप गरजेचे आहे याचे महत्त्व ओळखून मुलींना कायदा व न्यायव्यवस्था याची माहिती मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. हसिना शेख म्हणाल्या कि, भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकार हा स्त्रियांच्या विकासाचा पाया आहे . त्याचप्रमाणे महिला आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी विशेष कायदे करण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे मुलीकडे व महिलांकडे बघण्याचा समाजाचा व शासनाचा दृष्टिकोन हा कल्याणकारी आहे त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात निरनिराळ्या स्तरावर काम करताना मुलींना व महिलांना कोणत्याही चुकीचा व अयोग्य वातावरणाशी लढताना त्यांच्या तक्रारीची निवारण झाले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे .
महिलांना व मुलींना सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे महिलांना व मुलींना सुरक्षित वातावरण मिळाले तर त्यांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही महिलांवर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी कठोर कारवाईची कायदा व न्याय व्यवस्था मध्ये तरतूद केलेली आहे .
1948 साली संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काची सनद तयार केली त्यामध्ये महिलांचे काही वेगळे प्रश्न आहेत त्यांच्या मानवी हक्काच्या दृष्टीने वापस झाला पाहिजे असे त्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे . कोणत्याही मुलींबरोबर महिलांवर अन्याय होत असेल किंवा कोणी विनाकारण त्रास देत असेल तर अशा मुलींनी व महिलांनी कायद्याची मदत घेऊन त्यांच्या तक्रारी दाखल केल्या पाहिजेत व त्या तक्रारीची निवारण करणे हे कायदा व सुव्यवस्थेचे अध्य कर्तव्य आहे असे या कार्यक्रमात त्यांनी नमूद केले .
या कार्यक्रमात बोलताना पुढे त्या म्हणाल्या महिला व मुलींवर कोठेही कोणत्याही प्रकारच्या अत्याचार होत असेल तर कायद्याची मदत घ्या कायदा व सुव्यवस्था तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख प्राध्यापिका सौ. धनश्री हातोळकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्वेता कंगळे व आभार प्राध्यापिका आकांक्षा चौगुले यांनी मानले . या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .महेश ढेंबरे विभाग प्रमुख डॉ . तुळशीराम पिसाळ , प्राध्यापक संजय साळुंखे ,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक अनिल लोंढे, सर्व महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.