ताज्या घडामोडी

❇️ “शक्तिपीठ रद्द करा., तो पैसा शेतकरी कर्जमुक्तीसाठी वापरा” – विठ्ठल राजे पवार

❇️ “शक्तिपीठ रद्द करा., तो पैसा शेतकरी कर्जमुक्तीसाठी वापरा” – विठ्ठल राजे पवार

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 8/8/2025 : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी त्यासाठी कोणाचीही मागली नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करून त्यातील चाळीस हजार कोटी रुपये चा निधी शेतकरी कर्जमुक्तीसाठी वापरा अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी आज पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत केली, ते म्हणाले की सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यावर लादून शेतकरी कर्जमुक्ती टाळणार असेल तर येत्या 15 किंवा 16 ऑगस्टला राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी विधान सभेचे सर्व आमदार व भाजपा मित्र पक्ष सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणावा अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील विठ्ठल राजे पवार यांनी केली.

राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरती विठ्ठल राजे पवार बोलत होते, ते म्हणाले की शेतकरी संकटात आला आणि त्यांनी जर शेती सोडली तर राज्य आणि देशाची अन्नसुरक्षा व्यवस्था धोक्यात येऊ शकते असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे, सरकार शेतकऱ्याची व संघटनांची सकारात्मक होत नसेल तर पुढील आंदोलनाची दिशा ही अत्यंत कडव्या स्वरूपाची असेल आणि सर्व संघटनांनी सर्व ताकतीने या आंदोलनात उतरावे अशी आवाहन देखील त्यांनी केले, यावेळी परिषदेचे आयोजक प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय लोकनायक बच्चुभाऊ कडू, माजी खासदार राजू शेट्टी अजित पाटील प्रशांत डुक्कर विजय कुंभार भाई रमेश जाधव निवासी संपादक ॲग्रोवन अनिल घनवट अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष बाबासाहेब देशमुख आमदार कैलास पाटील आमदार अजित नवले राष्ट्रीय सहसचिव अखिल भारतीय किसान सभा आदी मान्यवर यावेळी उपस्थित

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button