ताज्या घडामोडी

“अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओंकार ग्रुपच्या माध्यमातून १ कोटी रुपयांची मदत.”

“अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओंकार ग्रुपच्या माध्यमातून १ कोटी रुपयांची मदत.”

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 10/10/2025 : राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत ओंकार ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, संचालिका सौ. रेखाताई बोत्रेपाटील व संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस रु. १ कोटींचे योगदान देऊन शेतकऱ्यांच्या संकट काळात मोलाची मदत केली आहे.
ही मदत रक्कम मुंबई येथे, राज्याचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मंत्री दादा भुसे आणि मा. श्रीमती यामिनी पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी धनादेश प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. समाजाप्रती जबाबदारी म्हणून ही मदत रक्कम देणे हे आमचे कर्तव्य समजतो. ओंकार ग्रुप सदैव शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”
ओंकार ग्रुपने यापूर्वीही शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून, हा दानशूरतेचा उपक्रम त्याच सामाजिक संवेदनशीलतेचा एक भाग आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button